Wednesday, April 23, 2008

औरंगझेब - एक बरबादशहा !

लोकसत्ता-रविवार दिनांक ०७-जानेवारी'०७ : मुखपृष्ठावरील बातमी :
"औरंगजेबाच्या मॄत्यूला फेब्रुवारीत ३०० वर्षे पूर्ण - भूषण देशमुख-नगर"

वरील लेख वाचनात आला आणि मन विषण्ण झाले ! लोकसत्ता सारख्या प्रथितयश वॄत्तपत्राने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला ! मी सतत ३ आठवडे अगदी दिवस रात्र एक करून संशोधन करून काही लिहिले ते पुढे मांडत आहे.प्रत्येक माणसाला आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे , त्यामुळे सदरचा लेख हा कुणावरही टीका अथवा कुठल्याही जाती ध्र्माबध्दल अनास्था दाखविण्यासाठी लिहिलेला नाही हे मायबांप वाचकांनी लक्षात घ्यावे अशी कळकळीची "सप्रे"म विनंती !--------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे--------------------------

औरंगझेब - एक बरबादशहा !

१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या !
त्यांची ४०९ वी जयंती असा लेख काही लोकसत्ता मधे वाचायला जास्त आवडले असते !

ज्या औरंगझेबाच्या कबरीच्या फोटोसकट पहिल्या पानावर बातमी दिली गेली , त्या औरंगझेब बध्दल मायबाप वाचकांना अधिक माहिती मिळावी यासाठी हा सर्व ऊहा पोह ! हा लेख मी लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही !

ज्या तैमूरलंगाचे आपण वंशज आहोत असा औरंगझेबाला अभिमान होता, त्या तैमूरलंगा पासूनच आपण सुरुवात करुया.

मानव संहारात (हिडीस) आनंद मानणारा मध्य आशियातील एक संस्कारहीन तुर्क लुटारू म्हणजे तैमूरलंग ! युध्दात पकडलेल्या लोकांची मुंडकी तोडून त्यांचे मनोरे रचण्यात आनंद मानणारा हिडीस मनोवृत्तीचा एक नराधम म्हणजे तैमूरलंग ! दिल्लीवर १३९८ मधे स्वारी केली तेंव्हा त्याच्याजवळ एक लाख युध्द्कैदी होते आणि ते त्याचे गुलाम म्हणून राबण्यास तयार होते. पण , आपण दिल्लीच्या स्वारीत गुंतल्यावर ते बंड करतील या केवळ संशयाने त्याने त्या सर्वांचे शिरच्छेद केले !

माझ्या मूळ लेखात तुर्क लोकांची संपूर्ण वंशावळ मी दिली आहे पण या इथे ती प्रसिध्द केल्यावर नीट दिसत नाहे असे दुसर्‍या एका लेखाच्या वेळी ध्यानात आल्यामुळे ती इथे देत नाहिये. तूर्त आपण खुर्र्म ऊर्फ शाहजहानच्या अपत्यांपासून सुरुवात करू , शाहजहानला इराणी सरदार ऐतेमाद उद्दौला ऊर्फ घियास बेग याचा मुलगा आसफखान याची कन्या मुमताझ महल पासून एकूण १४ अपत्ये झाली ती पुढीलप्रमाणे :

१. मेहेरुन्निसा - ज. १६१३
२. जहाँ आरा - ०२-०४-१६१४ ते १६८१
३. दारा शुकोह - २०-०३-१६१५ ते ३०-०८-१६५९
४. शहा शुजा - २६-०६-१६१६ ते १४-०२-१६५८
५. रोशन आरा - ०३-०९-१६१७ ते ११-०९-१६७१
६. औरंगझेब - २४-१०१६१८ ते २०-०२-१७०७
७. उमेदबक्ष - १८-१२-१६१९ ते १६२१
८. सुरैय्याबानू - १६२१ ते १६२८
९. मुलगा - १६२२ - नामकरणापूर्वीच मृत्यु
१०. मुरादबक्ष - २८-०९-१६२४ ते ०४-१२-१६६१
११. लुत्फुल्ला - ०४-११-१६२६ ते मृत्यु दिनांक अज्ञात
१२. दौलतअब्जा - ०८-०५-१६२८ ते १६२९
१३. मुलगी - २३-०४-१६३० - जन्मतःच मृत्यु
१४. गौहर आरा - १७-०६-१६३१ ते १७०६

गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात दोहद येथे २४-ऑक्टोबर १६1८ रोजी जन्मलेला औरंगझेब याने जवळजवळ ५० वर्षे राज्य केलं पण अफाट वैभव , अमर्याद सत्ता असूनसुध्दा आपल्या हेकेखोर , जुलमी आणि संशयी वृत्तीमुळे , ज्या मराठ्यांना संपवायचे स्वप्न उराशी बाळगून तो दख्खनमधे उतरला , त्या दख्खनमधेच नगर येथे - म्हणजेच परमुलुखात त्याला मरण आलं !

या औरंगझेबच्या स्वभावाची आपण ओळख करून घेऊया :

१. लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती.अरबी , फारसी, हिंदुस्थानी आणि तुर्की
भाषेवर प्रभुत्व ! अक्षर सुंदर व वळणदार ! कुरान आणि हादीस तोंडपाठ !

२. धैर्यशाली , धाडसी व साहसी ! याचं एक उत्तम उदाहरण : २८ मे १६३३ - शहाजहानने हत्तींची झुंज लावली होते.ती पहायला औरंगझेब आपले ३ भाऊ दारा, शुजा व मुराद यांच्यासोबत आला होता.झुंज पाहता पाहता तो भान हरपून हत्तींच्या अगदी जवळ आला.तेव्हढ्यात एक हत्ती पिसाळला आणि औरंगझेबवर चाल करून आला.पण औरंगझेब मात्र तिठं ठामपणे उभा राहिला आणि त्याने चालून आलेल्या सुधाकर नावाच्या त्या हत्तीच्या गंडस्थळांत भाला फेकून मारला.तो वार सहन करूनही हत्ती तसाच पुढे आला आणि एका धडकेत त्यानं घोड्यासहीत औरंगझेबला खाली पाडलं.औरंगझेब पुन्हा उठून उभा राहिला.हत्ती इतका जवळ आला होता की , तेव्हढ्या लवकर त्याच्या बचावासाठी कुणीही येणं शक्यच नव्हतं ! कमरेची तलवार खेचून औरंगझेब अंतिम मुकाबल्यासाठी सज्ज झाला.तेव्हढ्यात आपला घोडा फेकत शुजा आला व त्यानं आपल्या भाल्यानं हत्तीला जखमी केलं.राजा जयसिंगानं आपल्या पथकासह धाव घेऊन औरंगझेबला संर्क्षण दिलं.दारूवाल्यांनी चर्कीस ची काही दारू वापरून स्फोट घडवून आणले.यामुळे व आलेल्या बाकी भालाईत लोकांच्या हल्ल्यामुळे सुधाकर घाबरून मागे वळला.ट्यावेळी चिंतातूर बादशहाने लाख मोहोरांचे बक्षिस देऊन त्याची कानौघडणी केली.यावर गुस्ताख औरंगझेब म्हणाला,"हत्तीसारख्या बलाढ्य जनावराशी लढताना मौत आली असती तरी त्यात नाचक्की कोणती होती?मोठमोठ्या शहा सुलतानांच्या आयुष्यावर मृत्यू अचानक पडदा टाकतो.मृत्यूत नाचक्की कसली?त्यात लांज वाटायचं काय कारण?लाज तर त्यांना वाटायला पाहिजे जे अशा प्रसंगी बहादुरी न दाखवतां बुझदिलीनं वागले !" या त्याच्या बोलण्याचा रोख दारा शुकोहवर होता , पण दारा तेंव्हा खरंच खूप दूर होता. हा त्याचा जळका , मत्सरी स्वभाव त्याच्या धाडसाबरोबर मरेपर्यंत कायम होता.

३. औरंगझेब भयंकर क्रूर होता.सत्नामी , शियापंथी, बोहरी , जाट , शीख व मूर्तीभंजनाच्या आड येणारे हिंदू - यांच्या त्याने क्रूर कत्तली केल्या.जून १६८९ मधे विजापूरच्या तुरुंगातील युध्दकैदी म्हणून असलेल्या १०० मराठ्यांपैकी हिंदुराव , बहिर्जी वगैरे पळून गेले म्हणून राहिलेल्या ८० लोकांची त्याने मुंडकी उडवली.आणि हे सर्व केंव्हा , तर "शरण आलेल्या शेकडो मुसलमानांना मराठे खंडणी घेऊन सोडून देत होते" ही पहात असताना !

४. छत्रपती संभाजी सारख्या तख्तनशीन राजाचा अपमानीत अवस्थेत हाल करून वध केला.या प्रकरणात त्याने दाखविलेली हीन अभिरूची केवळ तैमूरलंगालाच शोभणारी होती !

५. औरंगझेबाचा एक वकील इराणचा शहा अब्बास यांजकडे मोठा नजराण घेऊन गेला असतां , शहाने त्याचा अपमान केला , त्याची दाढीही जाळली आणि औरंगझेबाला शिव्या दिल्या व त्याची कुचेष्टा करणारे एक पत्रही त्याच्याजवळ दिले ! औरंगझेबाच्या शियाविरोधी कारवायांमुळे हा प्रसंग उद्भवला.हे हकीकत त्या वकिलाने येवून १६६६ मधे औरंगझेबला सांगितली , परंतु औरंगझेबाची आत्मनिर्भरता एव्हढी भयंकर होती की त्याने त्या वकिलाबध्दल सहानुभूती तर दाखवली नाहीच उलट "तू तेथीच त्याचा खून का केला नाहीस?" असे म्हणून त्या वकिलास सर्पदंश करवून ठार मारले !

६. रमझानचे रोझे चालू असताना औरंगझेबने आग्रा किल्ल्याला वेढा घातला.नंतर खिज्री दरवाजाच्या बाजुनं यमुनेचं पाणी आंत जात असे ते अडवलं.शहाजहानने औरंगझेबला पत्रातून लिहिले,"माझ्या गाझी पुत्रा , झाडाचं पानही खुदाच्या इच्छेशिवाय हलत नाही.पिकल्या पानाला गळून पडण्यासाठी सुध्दा खुदाची इजाजत घ्यावी लागते.नशिबाचा हा क्रूर खेळ त्याच्या मर्जीनेच चालला आहे कांय?कालपर्यंत नऊ लाख सेवकांचा पोशिंदा असलेला हा बादशहा आज थेंबभर पाण्याला महाग झाला आहे.आम्ही ज्यांना काफेर म्हणतो , ते या देशातले हिंदू खरंच धन्य आहेत, जे मेलेल्या माणसाच्याही तोंडात पाणी घालतात आणि आमचा फर्जंद दो स्व्तःला सच्चा मुसलमान म्हणवतो, रमझानच्या महिम्यात पित्याला पाण्यापासून वंचित करतो !
कीर्तीशाली पुत्रा, या फसव्या जगाचा अहंकार धरू नकोस.बुध्दी आणि विचारांचा अहंकार बाळग.हे नाशवंत जग म्हणजे एका निनावी काळोख्या खंडाकडे जाणारा अरूंद मार्ग आहे.शाश्वत सूख आणि वैभव हवं असेल खुदावर ईमान ठेव, मनुष्यमात्रांवर दया दाखव."
पित्यानं कळकळीनं लिहिलेल्या पत्राचं उत्तर औरंगझेबाने एका वाक्यात दिलं : "हे सर्व तुमच्या कुकर्मांचं फळ आहे , तुमचं तुम्ही भोगा !"
यानंतर शरण आलेल्या शहाजहानला औरंगझेबाने कैदेत टाकले-८ जून १६५८.नंतर त्याचे खूप हाल केले व २२ जानेवारी १६६६ ल तो कैदेतच मरण पावला.

७. तत्पूर्वी औरंगझेबनं मुराद आणि शुजाला ठार केलं होतंच.दारा शुकोह व त्याचा १४ वर्षांचा मुलगा सिपिहर शुकोह यांना एका चिखलानं भरलेल्या छोट्या हत्तीणीच्या छत नसलेल्या हौद्यात बसवून रणरणत्या उन्हात दिल्लीतून धिंड काढली.खवासपुर्‍यातल्या जनतेला प्रचंड कणव होती.त्या रीत्री दिल्लीत फाका सुरू झाला, चुली पेटल्या नाहीत !
तुरुंगातून दारानं एक करून व हृदयस्पर्शी पत्र आपल्या दावेदार व शत्रु असलेल्या औरंगझेबला लिहिलं : "हमारे छोटे बिरादर और बादशहा आलम् गीर , राज्य मिळवण्याची इच्छा आता आम्हाला राहिलेली नाही.ही बादशाहत तुम्हांला आणि तुमच्या वारसांना मुबारक ठरो.तुम्ही आम्हाला ठार मारायचं ठरवलेलं आहे.पण हा विचार तुमच्या विचारी मनाला शोभणारा नाही.ही हत्या अनावश्यक आहे.एखादं मकान आणि एक नोकर तुम्ही दिलात तर यापुढचं आयुष्य आम्ही खुदाची याद करत घालवू.आमची निंदा करण्यासाठी तुम्ही आम्हांला काफीर करार दिलांत.आम्हाला त्याचा बिल्कुल राग येत नाही.तुम्ही म्हणतां ते खरंच आहे.या क्षणी आम्ही अशा अवस्थेत आहोत की, निंदा आणि स्तुतीत कसलाही भेद आम्हांस दिसत नाही.खुदा तुम्हाला सलामत ठेवो !"
यावर औरंगझेबाचण दाराला २ ओळींचं उत्तर गेलं : "यापूर्वीही तू हुकूम उदुली केली होतीस.त्याहीवेळी तू राजद्रोह्यांपैकी एक होतांस !"
यानंतर कुली बेग याने ऐरंगझेबच्या सांगण्यावरून दाराला "हलाल" करून ठार मारले.दाराचे कापलेले मुंडके औरंगझेबाकडे पाठविले.औरंगझेबाने , रक्ताने माखलेला तो चेहेरा नीट ओळखता यावा म्हणून ते मुंडके धुवून आणायला सांगितले.ते मुंडके दाराचेच आहे याची खात्री पटल्यावर दाराचे अर्धवट मिटलेले नेत्र गुलामांकडून त्याने पूर्ण उघडायला लावले.आपल्या तलवारीच्या टोकानं मस्तकाला स्पर्श करत तो उद्गारला, "अय् बदबख्त ! तुझे मारकर आज हम यकीनन् गाझी हो गए ! तू जिवंत होतास तेंव्हा तुझं तोंडही पहाण्याची अमची इच्छा नव्हती.आज तुझं तुटलेलं मस्तकही पहाण्याची आमची इच्छा नाही."
यावर तो थांबला नाही."मरणान्तराणी वैराणी" ही उक्ती माणसांसाठी असते ना ! त्याला दाराच्या धडाचीही विटंबना करायची होती.त्यासाठी त्याने दाराच्या धडाची धिंड काढायचे ठरवले.हत्तीच्या पाठीवर दारा शुकोहचं धड उलटं लटकावत ठेवलं.नक्कारे वाजवून कोतवालीचे शिपाई लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेवू लागले.
हत्ती चालू लागला.
तुटलेल्या मानेतून काळपट रक्ताची धार रस्त्यावर सांडू लागली.उंच बांबूवर खोचलेलं दाराचं शीर नाचवत चेले पुढे निघाले.लोक ते दॄष्य बघून दु:खाने काळवंडले.अनेकांची वाचा बसली.दारा मेला याबध्दल लोकांची खात्री पटावी यासाठी ही धिंड काढण्यात आली.आदल्याच दिवशी म्हणजे बुधवारी जिवंतपणी आणि मेल्यावर गुरुवारी आपल्या सख्ख्या थोरल्या भावाची विटंबना करणारा औरंगझेब लोकांना सैतान वाटला.शहरभर फिरुन धिंड पुन्हा सकाळच्या दोन प्रहरी खवासपुर्‍यांत आली.दाराचं शीर आणि कबंध खवासपुर्‍यांत आणून जोडण्यात आलं.नंतर ते शहाजहानकडे पाठविण्यात आलं.पेटीत आवडत्या दाराचं प्रेत पाहिल्यावर शहाजहान बेशुध्दच पडला.जहाँ आरानं ते प्रेत पाहिल्यावर तिनेही मोठी किंकाळी फोडली.नंतर दाराचं शव हुमयूनच्या कबरीच्या आवारात पुरण्यात आलं !गुस्ल नाही , दुवा नाही, दोन आण्याचं कफनही प्रेताला लाभलं नाही !फातेहा न पढताच मुर्दा खड्ड्यात लोटण्यात आला व मातीनं बुझवण्यात आला.दाराचा मुलगा सुलेमान याला ग्वाल्हेरच्या तुरुंगात टाकून अफू मिसळलेलं पोस्ता हे पेय देऊन मे १६६२ मधे त्याचा वध करण्यात आला.
दाराच्या मृत्यूच्या आधी तो पकडला जाण्यापूर्वी , देशोधडीला लागलेल्या दाराच्या बायकोचा नादिरा बेगमचा बोलन खिंडीच्या आधी दाधरच्या अलिकडे दोन कोसांवर ६ जून १६५९ रोजी अंत झाला.मलीक जीवनच्या मदतीने शव लाहोरला पाठवलं गेलं.दाराच्या पश्चात् दाराची एक बेगम जुलेखा उदेपुरी जी जॉर्जीयन होती तिला औरंगझेबने आपल्या जनानखान्यांत ओढली.दाराची तिसरी पत्नी रानादिल ही लावण्यवती होती.ती आधी नर्तकी होती.दाराच्या मृत्यूनंतर विमनस्क अवस्थेत त्याच्या कबरीवर फातेहा पढणार्‍या रानादिलच्या सौंदर्यावर औरंगझेब भाळला.त्याने जुलेखाप्रमाणेच तिलाही निकाह लावण्याची लालूच दाखवली.पण रानादिल ही दाराशी एकनिष्ठ व पतिव्रता होती.तिने उलट निरोप पाठवला,"माझ्ह्यातलं तुला काय आवडलंय?"यावर औरंगझेबनं कळविलं,"मला तुझा सुंदर केशकलांप आवडलाय!"तेंव्हा तिने आपले सगळे केस कापून त्याच्याकडे पाठविले आणि कळविलं,"तुला हवं आहे ते घे !"एव्हढ्यानेही औरंगझेब शहाणा झाला नाही.त्याने तिला सविस्तर कळविलं की ,"मला तुझ्याशी निकाह लावायचांय्.तुला काही कमी पडणार नाही.मला दारा समजून तू माझी पत्नी हो !तुझ्या चेहेर्‍याचं सौंदर्य अपूर्व आहे , ते मला हवंय्.तू माझी हो !"
यावर त्या चारित्र्यसम्पन्न रानादिलने आप्ल्या महालात जाऊन सुरीनं सपासप आपल्या चेहेर्‍यावर जखमा करून घेतल्या.भळाभळा वाहणारं रक्त जमा करून औरंगझेबाकडे पाठवून तिने त्याला कळविलं , "तुला माझं सुंदर मुखकमल हवय, पण त्याची आता वाट लागलीय !"
एव्हढं झाल्यावर मूर्ख औरंगझेब शांत झाला !
पुढचं सारं आयुष्य दाराच्या आठवणींवर रानादिल संन्यासिनी प्रमाणे जगली !

८. आपला भाऊ दाराबाबत दाखविलेले हिडेस्स क्रौर्य त्याने परत छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत व कवी कलश यांच्या बाबत पण दाखविले.आपली मुलगी झेबुन्निसा हिला पण त्याने तुरुंगात टाकून तिचे हाल हाल केले.त्याच्याकडून कैद व्हायचा त्याचा मुलगा अकबर एकटा वाचला पण त्यालाहे परागंदा व्हावे लागले व अखेर तो निर्वासित अवस्थेत इराणमधे मरण पावला !
झेबुन्निसा नावाप्रमाणेच "लावण्यलतिका" होती.ती फारच हुषार व चुणचुणीत होती.अल्पवयात सबंध कुराण पाठ करून तिने ३० हजार मोहोरा बापाकडून मिळवल्या होत्या.ती बापाची सर्वांत लाडकी होती पण 'अकबराच्या आपल्याविरुध्दच्या बंडात तिची सहानुभूती अहे' असे समजताच औरंगझेबने तिला कैदेत टाकले , काही वर्षांनी ती कैदेतच मरण पावली.

९. राजा जयसिंग याने दाराशी केलेल्या नमकहरामीमुळे औरंगझेबला बादशाही मिळाली.पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून गेल्यावर त्याला जयसिंग मिर्झाचा संशय आला व त्याने त्यालाही कपटाने विषारी चिलखत वापरावयांस देवून ठार मारले !

१०. वर्षानुवर्षे मोगलांशी ईमान बाळगणार्‍या राजपुतांवर त्यने १६७९ पासून राज्य खालसा करण्यासाठी युध्द सुरु केले.

११. १६६९ मधे औरंगझेबने काशीचे विश्वेश्वराचे देऊळ व ज्याच्या बांधकामाला त्याचा मोठा भाऊ दारा याने मदत केली होती ते मथुरेचे केशव मंदिर त्याने पाडले.या देवळे पाडण्याच्या मोहिमेत ज्या हिंदूंनी विरोध केला, त्यांच्या सरसकट कत्तली केल्या.नंतर त्याने जेजूरीच्या खंडोबाचे व पंढरपूरच्या विठोबाचे देऊळ पण तोडले.

१२. आयुष्यभर त्याने हिंदूंना बाटवून मुसलमान बनविण्यावर भर दिला.मुसलमानांत सुध्दा शिया व सुन्नी असा भेदभाव केला.तुर्क / मोंगल मुसलमानांना तो हिंदुस्थानी मउसलमानांपेक्षा श्रेष्ठ समजत असे.सर्व हिंदूंवर त्याने "जिझिया" कर बसवला.

अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !

कारणे काहीही असोत् , मरणोत्तर त्याने मायमराठीच्या मनावर सत्ता गाजविणार्‍या "लोकसत्ता"मधे प्रथम पॄष्ठावर स्व्तःच्या कबरीच्या छायाचित्रासह झळकून छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांवर निस्सीम प्रेम आणि श्रध्दा बाळगणार्‍या तमाम मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अढळपद मिळवलंय ! आजच्या २१ व्या शतकांतील ओसामा बिन् लदेन् व सद्दाम हुसैन यांसारख्या जुलूमशहांना व अतिरेक्यांना लाजविणार्‍या अशा या १७ व्या व १८ व्या शतकातील क्रूर , कपटी , नीच व कृतघ्न औरंगझेबाला "या फेब्रुवारीत मरून ३०० वर्षे पूर्ण होणार!" म्हणून मानाचे स्थान देणार्‍या नगरच्या श्री.भूषण देशमुख व लोकसत्ता यांचे कौतुक करायला गेले दोन आठवडे मी शब्द शोधतोंय , पण ते शब्द कुठेतरी रायगडच्या समाधीखाली आणि वढू बुद्रुकच्या समाधीखाली इतके रुतून बसलेत की ते काढताना माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबतच नहियेत !

अरे लांगुल्चालनच करायचे असेल तुम्हाला तर , आमचे राष्ट्रपती व महान संशोधक ए.पी.जे.अब्दुल कलाम किंवा मदारी मेहेतर यांचे करा ना ! या अश्या प्रभृतींबाबत मनांत "धर्म" हा शब्दसुध्दा येत नसेल कुठल्याच हिंदुस्थानी माणसाच्या मनांत !
शेवटी इतकंच म्हणेन :

निंदकाचे घर असावे शेजारी
कपट्यांची मझार असावी "बाजारी"
तिथे जो फुले ठेवून लावेल हजेरी,
तोच गाजवील "लोकसत्ता", बाकी सर्व आजारी !

बा.भ.बोरकर म्हणाले होते,

दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,
तेथे कर माझे जुळती !

आणि आजची ही परिस्थिती पाहून वाटते,

चबुतर्‍यांची जेथ प्रचिती
तेथे "मिंधे" कर जुळती !

कुठेतरी बा.भं,चा आत्मा तळतळला असेलच ना?

कुमार केतकर "मराठी" आहेत असे म्हणायची लाज वाटते आम्हास!

अशा या नरभक्षक , कपटी , कृतघ्न , धर्मांध आणि संशयाचा महामेरूमणी असलेल्या औरंगझेबचा मॄत्यु२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरला झाला.जसा १४ फेब्रुवारी हा व्हॅलेन्टाईन डे म्हणून साजरा करतात तसा, माझ्या मते २० फेब्रुवारी हा दिवस जगात नाहे तर किमान पक्षी हिंदुस्थानात तरी "माणुसकीचा नवा जन्मदिवस " म्हणून साजरा करायला हवा.याबाबत समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळी फारच समर्पक वाटतात :

बुडाला औरंग्या पापी
म्लेंच्छ सम्हार जाहला
मोडिली मांडिली क्षेत्रे
आनंदवनभुवनी !

------------------उदय गंगाधर सप्रे - ठाणे - २१-जानेवारी-२००७.-----------------------------

Sunday, April 20, 2008

मैत्री म्हणजे कांय?

मैत्री म्हणजे कांय?

समज तुला तहान लागली आहे.

समोर पाणी नाहिये , यावेळी मीही तुझ्यासोबत नाहिये.

अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती

मी माझ्याकडे ओढून घेतली आहे !

मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी ,

ओढून घेतलेली तहान आहे.

ते नातंच इतकं महान आहे , की ,

त्याला मैत्री हे शिर्षक खूपच लहान आहे !

मैत्री म्हणजे मला जाणवलेला

तुझ्या घशाचा कोरडा आहे !

ज्याला हे समजलं तो शांत आहे ,

इतरांचा मात्र मैत्रीच्या नावाने ओरडा आहे !

Wednesday, April 16, 2008

Wednesday, April 9, 2008

शिवरायांचे "८" वावे रूप



रसिक वाचकही , "सप्रे"म नमस्कार !
या लेखाचं शिर्षक वाचून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटले असेल्.काहींच्या मनात असंही आलं असेल की आजच्या या संगणक युगात ई-मेल मधे लिहितात तसंच हे पण काही शॉर्ट कट वगैरे आहे की काय?
पण माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांना मी अत्यंत विनम्रपणे हे सांगू इच्छितो की "या शिर्षकात वापरलेला"८" ह्या आकड्याला शिवरायांच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्व आहे" हे कळावे म्हणूनच हा एव्हढा ऊहापोह ! मी स्वतः एक अभियंता असल्यामुळे कदाचित मला हे "अंकशास्त्र" भावले आहे आणि लेख वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा निवाळ योगायोग नव्हे !

लेख सुरु करण्यापूर्वी "गुणांक" महणजे काय हे समजावून घेवूया कारण यालेखात हा शब्द फार वेळा येणार आहे.

समजा एखाद्या माणसाचा जन्मदिनांक २१-मार्च-१९८५ आहे तर त्याच्या जन्मतारखेचा गुणांक काढण्यासाठी आपण सगळ्या आकड्यांची "एक" अंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करायची - जसे यात २१-०३-१९८५=२+१+३+१+९+८+५=२९=२+९=११=१+१ =२, म्हणजे गुणांक "२"

तर आता आपण मूळ लेखाकडे वळुया.या लेखाचे "८" महत्वाचे "योगायोग" आहेत ते क्रमशः असे :

१. शिवरायांना "८" बायका होत्या :
१. सईबाई निंबाळकर
२. सगुणाबाई शिर्के
३. सोयराबाई मोहिते
४. लक्ष्मीबाई विचारे
५. सकवारबाई गायकवाड
६. काशीबाई जाधव
७. पुतळाबाई मोहिते
८. गुणवंताबाई इंगळे

२. शिवरायांना "८" अपत्ये होती ती पुढीलप्रमाणे :

माता अपत्याचे नांव अपत्याच्या नवरा / बायको चे नांव
सईबाई १. सखुबाई ऊर्फ सकवारबाई - महादजी निंबाळकर
२. राणुबाई ऊर्फ राणूअक्का जाधव
३. अंबिकाबाई हरजीराजे महाडिक
४. संभाजी येसुबाई, दुर्गाबाई, चंपाबाई (कछवाह घराणे)
सोयराबाई ५. दीपाबाई विसाजीराव
६. राजाराम जानकीबाई,ताराबाई,राजसबाई,अंबिकाबाई
सगुणाबाई ७. नानीबाई ऊर्फ राजकुंवर गणोजी शिर्के
सकवारबाई ८. कमलाबाई जानोजी पालकर (नेताजी पालकरांचा मुलगा)

३. शिवरायांची उंची होती ५' ८" = १७० सेंटीमीटर=१+७=८ गुणांक "८"

४. शिवरायांचा जन्म : १९-०२-१६३०=१+९+२+१+६+३ =४ जन्म गुणांक= ४
शिवरायाचा म्रुत्यु : ०३-०४-१६८०=३+४+१+६+८=४ म्रुत्यु गुणांक=४
आयुष्याचा गुणांक्=जन्म गुणांक्+म्रुत्यु गुणांक= ४+४ = "८"

५. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रोहिडेश्वरी : १५-०४-१६४५, गुणांक "८"

६. कल्याण्-भिवंडी काबीज केली : २४-१०-१६५७ , गुणांक "८"

७. सईबाईंचा म्रुत्यु : ०५-०९-१६५९ , गुणांक "८"

८. शिवरायांचा राज्याभिषेक झाला (१६७४ साल) तेंव्हा त्यांचे वय होते ४४ पूर्ण = ४+४= गुणांक "८"
शिवरायांचे वजन होते १६,००० होन= ४ मण
शिवरायांच्या सिंहासनाचे वजन होते ३२ मण , म्हणजेच शिवराय स्वतःपेक्षा त्या पवित्र सिंहासनाला ३२ /
४= "८" पटीने मान द्यायचे
राज्याभिषेकानंतर शिवरायांनी मंत्रीमंडळाची स्थापना केली : "अष्ट" प्रधान मंडळ , मंत्री "८"

म्हणूनच तर समर्थ रामदास स्वामींनी म्हटले नसेल ना?

शिवरायांचे "८" वावे रुप
शिवरायांचा "८" वा प्रताप
शिअवरायांचा "८" वावा साक्षेप
भू मंडळी !

आम्ही पण "८"वतो शिवरायांना "अष्टौ"प्रहर म्हणजे "८" प्रहर !
हा लेख मी लिहिला (बरेच दिवस मनात असूनही काल लिहिला) २६ तारखेला - गुणांक "८" , साल - एकविसाव्या शतकातील "८" वे , लेख पूर्ण केल्याची वेळ रात्री १० व. ३१ मि. म्हणजेच इंग्रजी वेळेप्रमाणे तासांच्या हिशोबात २२.३१ अवर्स = २+२+३+१= गुणांक "८"

अश्या या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत "अष्ट्"दिशांना पसरत राहो ह्या सदिच्छेसह,

उदय गंगाधर सप्रे-ठाणे
Sudayan2003@yahoo.com

"शिवरायांचे "८" वा वे रूप" मधे लिहायचे राहून गेलेले ३ योगायोग

हे योगायोग असे :
१. शिवरायांची राजमुद्रा "अष्टकोनी" होती.
२. राजमुद्रेवरील एकूण अक्षरी ३२ - आणि ती ८-८ च्या पटीतच म्हणतात - बघा : प्रतिपश्चंद्र लेखैव , वर्धिष्णूर्विश्ववंदिता,शाहसुतो* शिवस्यैषा , मुद्रा भद्राय राजते
* सगळीकडे शाहसुनो असे लिहिले जाते ते अयोग्य आहे असे वाटते कारण शहाजी राजे हे संसकृत चे उत्तम जाणकार होते त्यामुळे त्यांनी लिहून देताना शाहसुतो (म्हणजे शहाजीचा पुत्र - सुत म्हणजे पुत्र) असेच लिहून दिले असणार पण मुद्रा ङ्हडविणारे लोक हे काही शहाजी राजांएव्हढे सुशिक्षित नसावेत किंवा त्याकाळी मुद्रेवर एकदम सफाईदार अक्षरे कोरण्याएव्हढे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते.
३. शिवरायांची राजकीय कारकीर्द वयाच्या १५ पासून ते ५० पर्यंत म्हणजेच ३५ वर्षे होती - ३+५= गुणांक "८"

४. शिवराय आग्र्याच्या कैदेतून निसटले : १७-ऑगस्ट-१६६६ : गुणांक "८"
५. शिवरायांची राज्याभिषेकाच्या आधी त्यावेळी हयात असलेल्या ६ राणुआंशी परत लग्ने लावली गेली वैदिक पध्द्तीने : ३०-मे-१६७४ : गुणांक "८"

अनावधानाने हे लिहयला विसरलो , क्षमस्व !

उदय "सप्रे"म

Monday, April 7, 2008

गुढी पाडवा - शुभेच्छा - १


मदन मोहन


ही पण "श्रीं" ची च इच्छा !



रसिक वाचक,"सप्रे"म नमस्कार ! आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३२८ वी पुण्यतिथी ! या निमित्ताने , माझ्या आगामी "झंझावात" या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे."माणसात पण देवत्वाचा अंश असतो" हे ग.दि.मां ई आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे :
ज्ञानियांचा वा तुक्याचा
तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात थोडा
ईश्वराचा अंश आहे !
आजच्या या रसातळाला चाललेल्या "आरक्षण" रूपी आमिषांनी आपली तुंबडी भरणार्‍या राजकारणी जमान्यात , शिवराय , तुमची खूप कमतरता भासते !
तुमच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !
जीवाशी खेळताना प्रत्येक क्षणी,
मातृभूमीसाठी लावताना बाजी
नसांनसांत दौडत जाते -
ती वृत्तीम्हणजेच छत्रपती शिवाजी !--------------------------------------------

माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३२८ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे - "आत्मा बोलतो" यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३७८ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !त्याआधी आम्ही तुम्हांस ३२८ वर्षे मागे नेतो.....
आज चैत्री पौर्णिमा - रामभक्त हनुमानाची जयंती - म्हणजे तुमच्या आजकालच्या "इंग्रजा"ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला "पोरका" समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विष्वल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !
ग्लानी येत्येय पण डोळ्यांसमोर दिसतोय दख्खनेत उतरण्याची तयारी करणारा आलम् गीर ! दक्षिणेत यायच्या तयारीत असलेला एक वेडा पीर ! सम्पूर्ण मुघल खानदान तैमूरलंगापासऊन इथे आलं.त्यांना फक्त ही भूमी जिंकायची जमीन वाटली , मातेच्या नाळेचा आणि बाळाचा संबंध जणु यांना ठावेच नाही ! आम्ही ही भूमीच आमची माता मानली ! बहुसंख्य हिंदू असलेल्या या भूमीत हिंदुंची देवळे पाडली गेली, इथल्या मुसलमानांना सुध्दा मुघलांनी दुय्यमच वागणूक दिली, स्त्रियांची अब्रू चव्हाट्यावर येत होती ! हे सर्व थांबविण्याच्या निर्धाराने आम्ही वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वरी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली ! फक्त शपथ घेतली - काही लेखकांनी लिहिल्याप्रमाणे "करंगळी" वगैरे काही कापली नाही - वृथा रक्त सांडण्याची शिकवण आम्हांस ना जिजाऊ मॉसाहेबांनी दिली ना आम्ही "गनिमी कावा" ज्यांच्याकडून शिकलो त्या आमच्या महाराजसाहेबांनी आम्हाला ही शिकवण दिली !



कफल्लक अवस्थेतून सुरुवात करून गेल्या पस्तीस वर्षांत जे कमावलं ते एव्हढ्याचसाठी की आज ना उद्या दिलीश्वर दक्षिणेत येणार आणि त्याला तोंड द्यायचं तर पदरी पुरेसे सैन्य, मुबलक शस्त्रं, धन आणि किल्ले हवेत ! आजमितीस ३६० किल्ले राज्यास जोडले."एक एक किल्ला एक एक वर्ष लढवला तरी आलम् गीर ला ३६० वर्षे लागतील दख्खन जिंकायला"हा आत्मविश्वास होता अगदी गेल्या अकरा दिवसांपूर्वीपर्यंत्.पण राज्य लालसेने जे मुघल राज्यकर्त्यांनी केले ते प्रत्यक्ष रायगडावर महाराणींनी करताना पाहून कलेजा फाटून गेला, येणार्‍या काळात उद्याच्या छत्रपतींना-म्हणजेच पर्यायाने शंभुराजांना एक शत्रु घरात आणि एक दारात असे युध्द खेळावे लागणार असे दिसते.राजारामांच्या लग्नानंतर आठ नहाणाच्या "मेजवानी" ने आम्हाला हा "दृष्टांत" दिला आहे .....
राजारामाच्या लग्नाचं आमंत्रण अभिषिक्त राणी असूनदेखील ज्यांना "राजमाता" बनता आलं नाही त्या सोयराबाई राणीसाहेबांनी युवराज संभाजी आणि येसुबाई यांना मुद्दाम दिलं नाही ! अर्थात् यातही आम्ही युवराजांसाठी नियतीने लिहून ठेवलेला धोक्याचा इशाराच पाहिला.दूरदृष्टी आताशा आम्हास एक शापच वाटते ती याच कारणाने - कारण जे आम्ही बघतो ते आमच्या अष्टप्रधान मंडळातील एकालाही आमच्या बरोबरीने दिसत नाही.
युवराज शंभुराजे वयाच्या आठव्या वर्षी मोंगली मनसबदार झाले, आग्र्याहून सुटका झाल्यावर आम्ही पुढे निघून आलो तेंव्हा ते धैर्याने कृष्णाजीपंतांकडे मथुरेस राहिले ! त्यांच्या जिवंतपणी आम्हास त्यांचे दिवस घालावे लागले आलम् गीर ची दिशाभूल करण्यासाठी , पण ह्यांनी त्याबध्दल एका शब्दानेही आम्हास आजतागायत काही म्हटले नाही.त्यांची बुध्दी तेज आहे, आम्ही रायगडी असता रामराजांच्या-होय्-राजारामास ते राम्राजेच म्हणतात्-तर रामराजांच्या लग्नाला बोलावणे नाही यामागचा "ना" बोलविता धनी कोण हे ओळखण्याइतकी त्यांची बुध्दी नक्कीच तेज आहे.प्रत्यक्ष आमची आज्ञा डावलली जाते यामागचे राजकारण त्यांच्या नकीच लक्षात येईल्.कारण आम्ही कितीही रागावलो असलो तरी राम-भरता प्रमाणे असणार्‍या या बंधूंच्या जोडीस आमचे नेहेमीच आशीर्वाद असतील हे युवराज जाणतात !
हे "श्रीं"चं राज्य - स्वराज्य निर्माण करत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असणार्‍या माणसांना आमचा राज्याभिषेक होताच यशातील आपला हिस्सा व हक्क दिसू लागला.बाळाजी आवजी,अणाजी दत्तो ते मोरोपंतांपर्यंत सर्वांनी - एक हंबीरराव वगळता , सिंहासनाची पिढीजात सेवा आमच्याकडून मंजूर करून घेतली.आमच्या राज्याभिषेकानंतर खुद्द महाराणी साहेबांना सुध्दा "अभिषिक्त"पणाची धुंदी चढली.दहा वर्षाच्या अशक्तम् दुर्बलम् पोराकडे राज्याचा भावी छत्रपती म्हणून बघण्याएव्हढी त्या धुंदीमुळे त्यांची नजर वहावत गेली.आणि यासाठी पठिंबा कुणाचा ? - तर राज्याचे सुरनवीस - अण्णाजी दत्तो यांचा ! अण्णाजेंसारखा मुरब्बी राजकारणी सुध्दा जनानी राजकारणाला बळी पडावा ना?
अण्णाजींकडे माहेरपणाला आलेल्या त्यांच्या मुलीच्या - गोदावरीच्या "न" गेलेल्या अब्रूबध्दल युवराजांनी ती अब्रू घेतली असे संशयाचे भूत अण्णाजी आणि त्यांचे कुटुंब सरस्वतीबाई यांच्या मनात भरवून देण्याची थोर कूटनीती महाराणींनी वापरली.युवराजांचा न्याय करण्यासाठी केलेल्या चौकशीचा दिवस अजून आठवतो .....हातीपायी बेड्या घातलेले युवराज आरोपानंतर बेडरपणे आमच्या डोळ्यांस डोळा भिडवून आम्हांस म्हणाले,"आम्ही बाईंना आमच्या अखत्यारीत लिंगाण्यावर कैदेत ठेवले आहे.कारण प्रत्यक्ष आमच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न या रायगडावरील काही प्रतिष्ठित मंडळी करीत आहेत याचा सुगावा आम्हांस लागला होता.आमच्या निरपराध पणाची साक्ष आपण बाईंना इथे बोलावून आणून घ्यावी एव्ह्ढीच आमची आपल्या पायाशी विनंती आहे !"आम्ही मोरोपंतांस लिंगाण्यावर धाडले बाईंना सन्मानपूर्वक घेवून येण्यासाठी.पण तत्पूर्वी आम्ही जेंव्हा विचारले ,"कोण प्रतिष्ठित मंडळी हा प्रयत्न करताहेत?" , तेंव्हा राणीवशाकडे एकवार जळजळीत नजर टा़कून युव्राजांनी मान खाली घालत एव्हढेच म्हटले,"माफी असावी पण , ती नावे या भर सभेत घेण्याएव्हढी आमची पायरी नाही!"तिकडे ती निष्पाप पोर- "निरपराध युवराजांवर आपली "न" घेतलेली अब्रू घेतल्याचा खोटा आरोप करावा तर आपलीच अब्रू चव्हाट्यावर येते आणि न करावा तर प्रत्यक्ष जन्मदात्या आई-बापांवर खोटे आरोप्-ते ही प्रत्यक्ष युवराजांवर केल्याचे पातक लागते!" या द्वीधा मनःस्थितीत सापडली आणि तिने लिंगाण्यावरून स्वतःस खाली लोटून देऊन यातून सुटका करून घेतली.पण न केलेल्या गुन्ह्याबध्दलचा युवराजांवरील संशय लोकांच्या मनात दृढ करून आणि आंधळ्या पुत्रप्रेमाची वावटळ आमच्या विरुध्द इतिहासात कायमची नोंद करुन गोदावरी गेली ! या धक्क्यातून पुढे सरस्वतीबाई पण सावरु शकल्या नाहित आणि त्या ही गोदावरीपाठोपाठ काहे दिवसांतच निजधामांस गेल्या ! या सगळ्यांमुळे अण्णाजींच्या मनांत मात्र युवराजांच्याविरुध्द कायमची अढी निर्माण झाली .ज्या "स्त्री" च्या शीलाचे रक्षण करण्यासाठी आम्ही हे स्वराज्य निर्माण केले, त्याच स्वराज्याच्या सिंहासनासाठी प्रत्यक्ष महाराणींनी-एका स्त्रीनेच एका स्त्रीच्या शीलाचे भांडवल करून युव्राजांचे चारित्र्यहनन केले आणि प्रत्यक्ष छत्रपतींची निष्कलंक न्यायाची कारकीर्द कलंकीत केली - इतकी की तो अविश्वास अण्णाजींच्या नजरेत आम्हांस आमरण पहावा लागला ! यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते?
आम्ही आजारी पडल्यावर आणि आम्हांस आमचे भवितव्य दिसावयास लागताच आम्ही बाळाजी आवजींना पन्हाळ्यावर युवराजांना आमच्या आजारपणाबध्दल कळवायला सांगून बुलावा धाडण्याचा खलिता लिहावयास सांगितला होता. पण मधे आठ दिवस जाऊन पण युवराज आले का नाहित असे विचरताच महाराणी साहेबांचे ठसक्यात उत्तर आले,"इकडच्या स्वारींबध्दल इतकी काळजी असती तर गेलेच असते कशाला ते दिलेरखानाकडे निघून?".आम्ही पुतळाबाईसाहेबांना पालखी पाठवून गडाखालून बोलावून घेण्यास सांगितले होते, त्याही आल्या नाहित , यावर पण महाराणी साहेबांनी सांगितले,"इकडचा महालच आजारी आहे !"
"आदिलशाही, कुतुबशाही आणि मोघल आलम् गीर या सारख्या बलाढ्य सत्तांना काबूत ठेवणार्‍या छत्रपतींना आपल्या लोणकढी थापा कळल्या नाहित" या भ्रमात रहाणार्‍या अतिसामान्य बुध्दीच्या बाईस महाराणीपद मिळावे यासाठीच का परमेश्वरा तू सईबाईंना आमच्यापासून दूर नेलेस?
हंबीरराव, राजाराम, युवराज आणि येसुबाई यांचा अपवाद वगळता सर्वच लोकांची निष्ठा राज्याच्या ऐवजी राजाच्या - आमच्याच ठायी असावी? य सार्‍या लोकांना आमचे अफझल वधाच्या वेळी भेटीस जातानाची आमचे निर्वाणीचे बोल का आठवले नाहित , कधीच? आम्हास आजही लख्ख आठवते, आम्ही म्हणालो होतो,"आम्ही तो खानाच्या भेटीस निघालो, खानांस मारूनच स्वराज्य तरणे आहे ! पण ये कामी जर आम्ही नाकामयाब होऊन मारले जातो, तर मरता मरता हे समाधान असेल की स्वराज्य रक्षणासाठी जीव जातो आहे.मागे उरलेल्यांनी शोक करू नये, छोट्या शंभुबाळास मॉसाहेबांच्या मांडीवर ठेवून त्यांच्या सल्ल्याने स्वराज्य राखणे ! एक शिवाजी गेला तरी चालेल , पण स्वराज्य संपता नये, तुमच्या निष्ठा स्वराज्याशी ठेवा शिवाजीशी नाही !"
हंबीरराव्-एक नि:स्पृह सेनापती-सरनौबत ! नेसरीच्या खिंडीत जेंव्हा प्रतापराव मारले गेले तेंव्हा सरनौबतपदासाठी आनंदरावांचे नांव पुढे आले.पण सैन्य निर्नायकी राहू नये म्हणून धैर्याने सैन्याची देखरेख करत थांबलेले "हंसाजी मोहिते" हेच सरनौबत पदासाठी अधिक योग्य आहेत असे ठामपणे फक्त आम्हा व्यतिरिक्त युवराजांनीच सांगितले होते. हंसाजी मामा - हंबीरराव या किताबासहीत सरनौबत झाले ! वास्तविक होऊ घात असलेल्या भावी महाराणींचा भाऊ म्हणून त्यांनी कधीच लाळघोटेपणा केला नाही , आणि आमची खात्री आहे - त्यांच्या निष्ठा स्वराज्याशी आहेत !
राजाराम - तो तर एक अशक्त मुलगा ! महाराणींच्या वटारलेल्या डोळ्यांत विरघळून जाणारे त्यांचे धैर्य आलम् गीर ला थोपवू शकेल काय?नि:संशय नाही, त्रिवार नाही ! हां एक मात्र खरं की राजारामाच्या निष्ठा सत्याच्या बाजूने आहेत - महाराणी नसताना ती चमक आम्ही त्यांच्या डोळ्यांत पाहिली अहे ! त्यांना सत्तेची हाव नाही, नव्हे तेव्हढी आपली कुवतच नाही हे ही ते जाणतात ! या "राम्"राजाचे हे "भरत"प्रेम त्यांच्या दादामहाराज अर्थात् शंभुराजांसाठी असेच कायम राहो हीच "श्रीं"च्या चरणी प्रार्थना !
शंभुराजे - एक निर्भीड - लखलखतं धारदार अस्र ! पण राज्याच्या जनानी हव्यासापायी रक्तबंबाळ झालेले एक दुर्दैवी युवराज ! आमच्या ज्या अष्टप्रधानांना वंशपरंपरागत "सेवा" हवी आहे त्यांनाच "केवळ मोठे युवराज म्हणून काही भावी छत्रपती म्हणून योग्यता सिध्द होत नाही, वंशपरंपरेने का राजाचे अधिकार द्यायचे असतात?" म्हणून युवराज भावी छत्रपती म्हणून नको आहेत.
येसुबाई- ही एकच पोर अशी आहे की जी मॉसाहेबांनंतर "राजमाता" होण्याची योग्यता आणि वकूब अंगी बाळगून आहे.आणि म्हणूनच आमची "शिक्के कट्यार" तिच्या हाती सुपूर्द करताना आम्हांस जराही संदेह वाटला नाहे.पण या शिक्के कट्यारीनेच महाराणी साहेबांचा स्त्री मत्सर जागा केला आणि वेळप्रसंगी कट्यार पण काय करील अश्या वाग्बाणांनी महाराणींनी तुम्हांस आणि पुतळाबाई राणीसाहेबांस बेजार केले, कारण त्या एकट्याच तुम्हांस समजावून घेऊ शकतात ! या शंभुबाळासारखा धगधगता "अंगार" पदरात बाळगण्याचं आणि सांभाळण्याचं धैर्य आई भवानी तुम्हांस देवो !
दिलेरखानाला जाऊन मिळालेले शंभुराजे स्वराज्यात परत आले पण भूपाळगडाच्या सातशे निरपराध लोकांच्या थोट्या केलेल्या उजव्या हातांचा आणि अथणीच्या शेकडो निरपराध लोकांच्या गेलेल्या जीवांचा कलंक माथी घेवूनच ! आयुष्यात केलेल्या या एकमेव मोठ्ठ्या चुकीने वयाच्या आठव्या वर्षांपासून केलेले पराक्रम आणि दाखवलेले धैर्य आणि शौर्य एका क्षणांत हे अष्टप्रधान मंडळ विसरले ! या सार्‍या लोकांच्या अक्षम्य चुका आम्ही कायम पदरात घातल्या, पण "शंभुबाळ, राजाला चुकून पण चुकता नाही येत हे ध्यानी धरा !"वेळ पडली तर एकच कांय पण असले छप्पन्न आलम् गीर या दख्खनमधे गाडण्याचं सामर्थ्य तुझ्या मनगटात आहे रे पोरा ! पण राजाने भावनाप्रधान , कवी मनाचे असून नाही चालत ! राजाला धूर्त आणि कावेबाजच असावं लागतं ! "तळे राखी तो पाणी चाखी" या उक्तीप्रमाणे अण्णाजी वा इतर मंत्र्यांनी केलेले गैरव्यवहार नजर अंदाज करण्याचं धोरणीपण जे आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे नाही, मनांत आलेले विचार चेहेर्‍यावर दिसू न देण्याची लबाडी तुमच्याकडे नाही,आवडेल त्यावर जान निछावर करणारे जिगर घेवून तुम्ही जन्माला आलात पण तुमचं जन्म घेण्याचं घराणंच चुकलं युवराज ! कुठल्या सरदाराच्या घरी जन्मांस येतात तर आम्ही तुम्हांस डोईवर घेण्याचेच बाकी ठेवले असते इतके उच्च प्रतीचे तुमचे सर्व गुण, पण आमच्या - या छत्रपतींच्या पोटी जन्मलात आणि तेही थोरले होऊन हाच तुमचा सर्वांत मोठा अवगुण युवराज !
सगळं काळंबेरं ओळखून पण शांतपणे आणि धोरणीपणे वागता यायला वयाची पन्नाशी यावी लागते युवराज ! पण दुर्दैवाने तुम्हासं तेव्हढा अवधी नाही, कारण आलम् गीर दाराशी उभा ठाकेल तेंव्हा दारांत एक आणि घरातच अनेक अश्या शत्रूंशी तुम्हांस लढावं लागेल आणि आमचं दुर्दैव की आम्ही अश्या वेळी तुमच्या पाठीशी रहाण्यासाठी या जगांत नसू !तरूणपणी संतापाच्या भरांत जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांच्या मुलांना मारण्याचे असंयमी कृत्य आम्हीही केलंच की ! आग्र्यास "आम्हांस जास्तीत जास्त भडकावून कैदेत डांबण्याएव्हढी आगळीक आमच्याकडून घडावी "यासाठी आलम् गीर प्रयत्नशील आहे हे ओळखून पण आम्ही भर दरबारांतून पाठ फिरवून येण्याची घोडचूक केलीच ना? "श्रीं" च्या कृपेने आपण सारेच यातून सुटलो पण कित्येक निरपराध जीवांची गुंतवणूक त्यावेळी आम्ही नाहक केल्याची रुखरुख अजून मनातून जात नाही !
आज बाहेर जगदीश्वराच्या मंदिरात महा मृत्युंजयाच्या जपांस ब्राह्मण बसलेत ! यांना कसे समजावणार की आज हनुमान जयंती- रामाच्या दासाची जयंती- आजच रामाच्या दासाच्या - समर्थ रामदासांचे कृपाभिलाषी छत्रपतींनी हा नश्वर देह टाकून निर्वाण करावे हे योग्य नव्हे कांय?आणि अशा जपांनी जर मृत्यू थांबता , तर आज सईबाईसाहेब "महाराणी" नसत्या काय? दादोजी - महाराज साहेब्-बाजी काका पासलकर्-कान्होजी जेधे -बाजीप्रभू देशपांडे-मुरारबाजी-तानाजी-काशीबाई राणीसाहेब्-मॉसाहेब यांना आम्ही जाऊ दिले असते कांय? "आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी जपाच्या माळेचा नव्हे तर धनुष्याचा दोराच सहाय्य करील" हे या देवभोळ्या माणसांना कळले पण वळले मात्र कधीच नाही !
आमचा लढा मानवता विरोधी हर एक दुष्टाशी होता , कुठल्याही धर्माशी आम्ही कधीच वैर केले नाही ! सामान्य माणूस मानाने जगू शकेल असा त्याच्या "स्व"तःच्या मनात विश्वास उत्पन्न करेल तेच ना स्वराज्य?नपेक्षा आम्ही याकूतबाबा , शहा शरीफ्,मौनी बाबा,रामदास स्वामी,तुकाराम महाराज या सार्‍या संतांच्या चरणी लीन झालो असतो काय? आणि नपेक्षा धर्माने "इस्लाम" चे बंदे असलेले सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहीम्,नूर बेग, काझी साहेब या सार्‍यांनी स्वराज्याशी ईमान वाहिलं असतं का?
पैलतीर दिसत असताना याक्षणी जगायची ही ऊर्मी का मनात दाटून येत्येय? जगायची हाव म्हणून्?निश्चीतच नाही ! तर आलम् गीर सारख्या बलाढ्य शत्रूला नामोहरम करणार्‍या माझ्या या बछड्याची -युवराज संभाजी ची कीर्ती दिगदिगंत पोचलेली पहाण्यासाठी आणि विजयी होवून आलेल्या त्या वीराला आमच्या नेत्रांनी औक्षण करण्यासाठी ! त्या क्षणी आमच्या तेजाळलेल्या नेत्रांत बघून या सार्‍या अलम् दुनियेला खात्री पटेल की शिवाजीने फक्त स्वराज्य नाहे घडवलं तर ते स्वराज्य राखण्यासाठी दैदिप्यमान धगधगत्या अंगाराची मशाल आपल्या युवराजांच्या रूपाने या हिंदवी स्वराज्यासाठी-या राष्ट्रासाठी जळत ठेवली आहे !
वडिलांचा अंत्यसमयी पुत्र पित्याच्या जवळ नसावा हा "भोसले" घ्राण्याला शापच आहे ! हे राज्य व्हावे ही "श्रीं" ची इच्छा होती आणि ती टिकवणारा भवानीचा भुत्या भविष्यात स्वराज्याचा पोत पाजळत जग उजळून टाकेल ! पण आजमितीस , अंगाची लाही लाही होत असताना शेवटचा श्वास घेण्यासाठी स्वराज्याच्या छत्रपतींना तुझ्यासारख्या महापराक्रमी आणि निर्मळ मनाच्या युवराजाची मांडी नसावी, ही पण "श्रीं" ची च इच्छा ! जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी हजारो जीवांची गुंतवणूक झाली, त्या जीवांचा सौदागर आपल्या सग्या सोयर्‍यांकडे भेटीला निघाला असताना, त्याची गुंतवणूक ज्या जीवात झाली आहे त्या स्वराज्याचा भावी तारणहार, राखणदार - आलम् गीर ला आव्हान देऊ शकणारा आणि ते समर्थपणे पेलण्याची ताकद अंगी बाणून असणारा "छावा" नजरेआड असावा आणि त्याची वाट पहाणारे हे दोन डोळे पन्हाळ्याकडे पहात पहात निष्प्राण व्हावेत ही पण "श्रीं" ची च इच्छा !